लगीन

असं कसं बा तुले, समजलं काही नाही.

लवकर लगीन करू नको म्हटलं, मायं ऐकलं तू नाही.

नाय नाय म्हणो तरी, केलं मायं लगीन

आता भोगते आहे, संसाररुपी हे इगीन.

नवरा म्हणतो, तू माह्या चपलेची धूळ

आलं माह्या नशिबी, आता चूल आणि मूल

गुलामीनं कसं जखडून टाकलं गं बाई.

बा तू माय लगन करायची का केली घाई.

सासू, ननंदा करतात, मायाच कामाचा हेवा

नाही काम केलं तर नवरा दावतो डोया.

मोठाल्या डोयाचा मले भेव नाही

माय बापाच्या इज्जतीसाठी, सार सोसते ग बाई.

– कांचन मिसाळ(तिडके)

    मूर्तिजापूर (अकोला)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top